google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ

नवीन डेडलाईन जाहीर; केंद्र सरकारचा निर्णय 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पीक प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची मुदत वाढवली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिक विमा भरता येणार आहे.

राज्य सरकारची मागणी
             प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. 15 जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रियेत अडचणी
               सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.

केंद्र सरकारचा निर्णय
                त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याचे मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!