
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : खुपटी व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानार्जन करणाऱ्या रामकृष्ण स्कूलला इयत्ता बारावीपर्यंतची महाराष्ट्र शासनाच्या वतीने दर्जावाढ मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ तनपुरे पाटील व सचिव अशोक चौधरी सर यांनी दिली.
विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन स्पर्धेच्या युगात सर्वोत्तम संपादनासाठी, उज्वल भविष्यासाठी व समृद्ध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी रामकृष्ण स्कूल सतत कार्यरत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शिक्षण व उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे काम चालू आहे.
रामकृष्ण स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यातील विविध स्पर्धापरीक्षा, परीक्षा, IIT, JEE, NEET, MHT-CET व फाउंडेशन परीक्षांची पायाभरणी केली जाते. तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात रामकृष्ण स्कूलचा विद्यार्थी कोठेही मागे राहणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया नक्की मजबुत करण्यासाठी विविध योजना कार्यरत आहे.
इयत्ता बारावीपर्यंत त्याची दर्जावाढ मान्यता मिळाल्याने परिसरातील सर्व पालक, गावकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.