google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आधार’ देऊनही लाभार्थी ‘निराधार’!

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकले; लाभार्थी हवालदिल; आधार लिंक बँक खाते चेक करण्याचे प्रशासनाचे आवाहन

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : हयातीचे दाखले, आधार क्रमांक, बैंक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सिडिंग केले, तरी जानेवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. 
            महाराष्ट्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लाभार्थ्यांना हयातीचे दाखले, लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसीलमधील संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागातून सांगितले होते. अगोदरच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सिडिंग करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
          त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली. आता कागदपत्रे सादर करून तीन ते चार महिने होऊन गेली आहेत. काही लाभार्थ्यांनी एकदा नाही, तर अनेकदा कागदपत्रे जमा केली, पण गेल्या काही महिन्यांपासून अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.
           याबाबत संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार संदीप चिंतामण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थीचे अनुदान माहे डिसेबर २०२४ पासून डीबीटी प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडुन दिले जात आहे. तथापि सदर प्रणालीद्वारे ज्या आधारकार्ड क्रमांक त्यांच्या अनेक खात्यांपैकी कोणत्या खात्यावर गेले? हे प्रशासन सांगु शकत नाही, तर ते आधार केंद्रावर जाऊन आधार क्रमांकानुसार शोध घेतल्यास बँक कोणती? हे लाभार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे आपण जर श्रावण बाळ / संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल, व आपल्या नेहमी अनुदान येणाऱ्या खात्यावर अनुदान जमा होत नसेल, तर आपण उरलेले सर्व बँक खात्याची शिल्लक खात्री करावी. तरीही आपणास लक्षात आले नसेल तरच आधार केंद्रावर जाऊन संबंधित बँकेविषयी माहिती करून घ्यावी.
        या योजनेचे ८५ टक्के डीबीटीचे कामकाज पूर्ण झाले असून १५ टक्के यात अंदाजे ८०० लोकांचे काम प्रणालीमध्ये समावेश करणे बाकी आहे. संबंधितांना पत्र पाठवून तहसील कार्यालयात बोलावले जाणार आहे. त्यांनी येताना आधार कार्ड व मोबाईल जो आधार लिंक केला असेल तो घेऊन संजय गांधी योजना नेवासा यांची भेट घ्यावी व संबंधित डीबीटीबाबतची कार्यवाही करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!