google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

‘शिवस्वराज्य’ वतीने गुणवंतांचा गौरव

उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा 'शिवस्वराज्य'चा प्रयत्न कौतुकास्पद-कडूभाऊ काळे

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे पंचवीस व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाम येथील स्व. वसंतराव होंडे पाटील सभागृहात झालेल्या ‘राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराच्या माध्यमातून शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचा न्याय देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नागेबाबा मल्टीस्टेट पतसंसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी केले.
           
              राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयाच्या प्रसंगी ‘वर्ल्ड कॉंन ‘किताब’ बहुमान प्राप्त करणारे नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, उद्योगपती के.के. आव्हाड, कृषी भूषण ज्ञानेश्वर माऊली पवार, जिल्हा परिषदेचे मा. सदस्य दिलीपराव वाकचौरे, शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव रमाताई वाघमारे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर माऊली पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
    
              या पुरस्कार वितरण सोहळयाच्या प्रारंभी उपस्थित  मान्यवर व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी स्वागत केले तर स्वागताध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या सचिव रमाताई वाघमारे यांनी संस्थेचे कार्य व उद्देश आपल्या भाषणातून बोलतांना विषद केले.
   
          यावेळी नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे म्हणाले की उपेक्षित घटकांना न्याय पुरस्काराने मिळालेला आहे. सर्व जातीच्या, धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, यात पुरस्कार प्राप्त केलेले पुरस्कारार्थी सर्व गुणी असे आहेत. संस्थेच्या कार्याला व सामाजिक उपक्रमांना समाजाने पाठबळ द्यावे, असे आवाहन करून त्यांनी पुरस्कार प्राप्त नागरिकांचे अभिनंदन केले.

          सदर प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पंचवीस जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर संजय वाघमारे यांनी उपस्थित पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे आभार मानले.
 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!