google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

चुरशीच्या लढतीत विजय कुणाचा?

अंमळनेर, शिरेगांव ग्रामपंचायत निवडणूक; दोन्ही गटांकडून विजयाचे दावे

                             स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : नेवासा तालुक्यातील मुळाथडी परिसरातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मा. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या दोन्ही गावांमध्ये त्यांच्याच गटात सरळ लढत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक चुरश निर्माण झाली असून वरील दोन्ही गावांच्या उमेदवारांनी विजय आपलाच असा दावा केला आहे.
             
                अंमळनेर येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश भांगे  यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदान १६८७ पैकी १४६४ मतदारांनी हक्क बजावला. लोकनियुक्त सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाचे अच्युतराव घावटे, विरोधी गटाचे ज्ञानेश्वर आयनर यांच्यात सरळ लढत होत आहे. तर सदस्य पदासाठी ८ जागेसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत.
               शिरेगांव येथे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण मतदान २१७२ पैकी १७९७ मतदारांनी हक्क बजावला. लोकनियुक्त सरपंच निरंजन तुवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदस्य पदांच्या ९ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत.
             शिरेगांव येथील बिनविरोध निवड झालेले निरंजन तुवर यांनी सांगितले की, मी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली काम करत असून मा. मंत्री शंकरराव गडाख पाटील व सभापती सुनिलभाऊ गडाख यांनी गावच्या विकासासाठी जो भरघोस निधी दिला. असेच काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची संधी शिरेगांवच्या जनतेने दिली. त्याबद्दल त्रणी असल्याचे सांगितले.
             सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार काकासाहेब राख, विठ्ठल थोरात, मृत्युंजय मोरे, तुपे, तमनर, पोलीस मुख्यालतील जायभायद, पालवेसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी नेवासा तहसीलदार कार्यालयात मंगळवार दिनांक 20 रोजी होणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!