स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने आणि पारिजात इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ’कृषी रसायनाचा सुरक्षित वापर’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे दि. 1 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
यावेळी केव्हीके दहिगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करताना कृषी रसायनाची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच केव्हीके द्वारे चालणारे विविध उपक्रम, शेतकऱ्यांसाठीच्या विविध सोयी सुविधा याबद्दल अवगत केले.
सदर कार्यक्रमास पारिजात इंडस्ट्रीजचे एरिया सेल्स मॅनेजर व रिजनल मॅनेजर संदीप कचरे आणि रमेश भवर यांनी शेतकऱ्यांना कंपनी मार्फत शेतक-यासाठी चालवले जाणारे उपक्रम तसेच विविध कृषी रसायने त्यांची हाताळणी वापर याविषयी मार्गदर्शन केले. फळबाग भाजीपाला इत्यादी पिकातील विविध किडी व रोग याबद्दल केंद्राचे पिक संरक्षण तज्ञ माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम संपल्यावर पारिजात इंडस्ट्रीज कंपनीच्या वतीने सर्व सहभागी शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी दहिगाव-ने उपसरपंच राजाभाऊ पाउलबुधे, राक्षी येथील मगर गुरुजी, भातकूडगाव येथील प्रगतशील शेतकरी आहेर गुरुजी, केव्हीके चे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे, डॉ. गवळी चंद्रशेखर, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते. इंजी. राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.