राजकिय
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आ. गडाख यांचे वर्चस्व
सर्व 13 ग्रामपंचायतचे सरपंच गडाख गटाचेच; मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित नेत्यांना धक्का
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यामध्ये यावेळी 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यामध्ये माका, माळीचिंचोरा, वडाळा बहिरोबा, भेंडा खुर्द, कांगोणी या पाच मोठ्या गावचे निवडणुका असल्याने सर्वांचे लक्ष राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेले या गावांकडे होते. नेवासा तालुक्यात सर्व 13 ग्रामपंचायतींवर आ. शंकरराव गडाख यांच्या गटाने बाजी मारून आपले सरपंच निवडून आणत आपला वरचष्मा सिद्ध केला.
कांगोणी गावांमध्ये मा.आ. बाळासाहेब मुरकुटे यांची सासुरवाडी आहे. त्यांचे मेहुणे बंडू शिंदे यांची तेथे सत्ता होती. यावेळी देखील सर्व तालुक्याचे या गावाकडे लक्ष होते. या ठिकाणी ना. शंकरराव गडाख यांच्या मानणारे सुधाकर कराळे हे विजय झाले. 11 सदस्यांपैकी आठ सदस्य मुरकुटे गटाचे तर तीन सदस्य आ. गडाख यांच्या गटाचे निवडून आले. येथे बहुमत शिंदे यांच्याकडे असले तरी सरपंच गडाख गटाचा झाला आहे.
भेंडा खुर्दमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथराव नवले यांची अनेक वर्ष ग्रामपंचायतीवर सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी त्यांचे नातेवाईक असलेल्या बाळासाहेब नवले यांच्या गटाने सत्ता परिवर्तन केले. या ठिकाणी वर्षाताई वैभव नवले या सरपंच पदी निवडून आल्या.
वडाळा बहिरोबा येथे अनेक वर्ष सत्ता असलेल्या भाऊसाहेब मोटे यांच्याविरुद्ध ललित मोटे गटाने विजय मिळवला. ललित मोटे मोठ्या मताधिक्याने सरपंचपदी निवडून आले व सत्ता उलथून टाकली.
माका येथे अनिल घुले गटाच्या विजया पटेकर सरपंच पदासाठी विजयी झाले. तेरापैकी दहा जागेवर अनिल घुले गटाचे सदस्य मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव पांढरे यांच्या गटाला तीन जागावर विजय मिळाला
गोधेगाव येथे देखील बेबी जालिंदर नरोडे यांची सरपंचपदी निवड झाली व सदस्यही गडाख गटाचे विजयी झाले. सुरेशनगरच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ या बिनविरोध निवडून आल्या.
हंडीनिमगाव येथे अटीतटीच्या लढतीत आमदार शंकराव गडाख यांना मानणार्या पूजा भिवाजी आघाव या सरपंच झाल्या. शिरेगाव येथे आ. शंकरराव गडाख यांना मानणारे निरंजन गोरक्षनाथ जाधव हे बिनविरोध सरपंच झाले.
खुपटी येथेही गडाखांचे वर्चस्व पहावयास मिळाले. येथेही दत्तात्रय वरुडे सरपंचपदी बिनविरोध निवडून गेले. चिंचबन येथे मीनाक्षी गोरक्षनाथ काकडे या बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या. हिंगोणी येथे रूपाली ज्ञानेश्वर खंडागळे याही बिनविरोध सरपंच झाल्या.
माळीचिंचोरा येथे अनेक वर्षे सत्ता असलेले तुकाराम शेंडे यांची सत्ता बदलून टाकत मुळा कारखान्याचे माजी संचालक एकनाथ धानपुणे गटाने विजय मिळवला या ठिकाणी राजू देवराव अहिरे हे सरपंच निवडले गेले केवळ 9 मताने त्यांचा विजय झाला
अंमळनेर येथे देखील आ. गडाख यांच्या दोन गटांत निवडणूक झाली. या ठिकाणी ज्ञानेश्वर काशिनाथ आयनर हे सरपंचपदी निवडून आले. अशा प्रकारे तालुक्यावर आमदार शंकरराव गडाख यांचाच वरचष्मा असल्याचे सिद्ध झाले.
याशिवाय बिनविरोध निवडले गेले सरपंच पुढील प्रमाणे-
खुपटी – दत्तात्रय सूर्यभान वरुडे,
शिरेगाव – निरंजन द्वारकानाथ तुवर
चिंचबन – मीना गोरक्षनाथ काकडे
हिंगोली – रूपाली ज्ञानेश्वर खंडागळे
सुरेशनगर – शैला कल्याण उभेदळ सरपंचपदी निवडून आले होते.