google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

अण्णांच्या प्रेरणेने ‘जनसंसद’ नव्या वळणावर

डॉ. अशोकराव ढगे यांचे प्रतिपादन 

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : भारतीय जनसंसद जिल्हास्तरीय बैठकीचे नुकतेच अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रदेश नेते अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, विचारवंत हेरंब कुलकर्णी, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे, रामराव पाटील भदगले, जाफर पठाण, भाऊसाहेब सुद्रिक, सुनील टाक, अंकुश निर्मळ, कुमार डावकर, जनार्दन शेजुळ, आशिष बोरा, फकीर शेख मोहम्मद या सर्वांनी भारतीय जनसंसदची कार्यप्रणाली तसेच तत्त्वप्रणाली व भविष्यातील रूपरेषा यावर मंथन केले.
                 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा आशीर्वाद व प्रेरणा घेऊन यापुढील कार्यात सर्वांनी सक्रिय होण्याचा व अहमदनगर जिल्हा कार्य केंद्रबिंदू ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. आप्पासाहेब माळवदे यांनी केवळ भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य न करता त्याला विधायक कार्याची जोड देऊन आपण चाळीस शाखा जिवंत ठेवल्याचे मनोगत व्यक्त केले. जनार्दन शेजुळ यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की यापुढील कार्यात भद्रे व सब्बन यांनी पुढाकार घ्यावा व कार्यकर्त्याला सक्रिय पाठबळ द्यावे. फटांगरे यांनी कार्यकर्त्यांनी द्विधा मनस्थिती न ठेवता कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून जिल्ह्यामध्ये मजबूत कार्य करावे, असे आवाहन केले. रामराव पाटील भदगले यांनी प्रतिपादन केले की कार्य नेटाने पुढे न्यावे व विशेषतः अहमदनगर जिल्हा कार्याचा केंद्रबिंदू करून अण्णांचे आशीर्वाद असल्याचे गृहीत धरून संघटना मजबूत करावी कारण समाजामध्ये संघटनेला किंमत आहे.
               या प्रसंगी आशिष गोरा यांनी नवीन तंत्रज्ञानाचा विशेषता सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त कार्याला प्रसिद्धी द्यावी. अशोक सब्बन यांनी महाराष्ट्रामध्ये न फिरता फक्त अहमदनगर जिल्ह्यात आता यापुढील काळात सक्रिय व्हावे. अशोक ससब्बन यांचे कार्य आदर्श आहे. तथापि ते प्रसिद्धी विणमुख असल्यामुळे समाजासमोर आले नाहीत. सध्या समाजामध्ये अनेक संघटना निष्क्रिय झालेले आढळतात. त्यामुळे भारतीय जनसंसद संघटना समाज उपयोगी असून ही सर्व पोकळी भरण्याची ताकद असून अशोकराव म्हणाले की संघटन अवघड नाही संघटना बांधता येईल व ती मोठी करता येईल. 
                  गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या व युवकांच्या तसेच महिलांच्या दृष्टीने विधायक कार्य केले आहे. त्याचा अनुभव गाठीशी घेऊन पुढील वाटचाल करता येईल. आज महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार, राईट टू रिकॉल असे अनेक कायद्यांचा अहमदनगर जिल्ह्यातच जन्म झाला असून समाजासाठी तक्रार निवारण केंद्र सर्व जिल्ह्यात उभे करता येतील. आजच्या अण्णांच्या भूमिकेबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांनी प्रेरणा मार्गदर्शन व पाठबळ द्यावे. अन्यथा भारतीय जनसंसद त्यांची प्रेरणा घेऊन विचाराचा वारसा घेऊन या पुढील काळात सक्रिय राहणार आहे. केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन संघटन मर्यादित स्वरूपाचे कार्य समाजापुढे मांडणार नसून विधायक कार्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल असे विशद करून सुधीर भद्रे यांनी संघटना शक्तिशाली करण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 
          शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मोलाच्या सूचना केल्या. त्यांनी प्रतिपादित केले की, महिला व युवकांसाठी रोजगार निर्मिती यासाठी मार्गदर्शन असावे. शेतकऱ्याच्या आत्महत्याबाबत जागृती करून न्याय देण्यासाठी लढा उभा करावा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!