google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणनोकरी

अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू

नगर जिल्ह्यात 727 पदे भरणार; भरती प्रक्रिया असणार पारदर्शक; पात्र महिलेला मिळणार गावातच नोकरी

                                     स्वराज न्यूज नेटवर्क

अहमदनगर : एकात्मिक बाल विकास सेवेअंतर्गत अंगणवाडी मदतनिसांची पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. शासनाने ही भरती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यात रिक्त असलेल्या ७२७ मदतनिसांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानिमित्ताने बारावी उत्तीर्ण महिलेला गावातच नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीसाठी समिती असून अर्ज केलेल्या उमेदवारांचे गुणांकन कसे करायचे याचे निकष निश्चित आहेत. त्यामुळे या भरतीत वशिलेबाजी करण्यास कुणालाही वाव नाही.
                राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्रा धारण करत मागील वर्षी मोठे आंदोलन केले. त्यात त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत शासनाने राज्यातील ज्या काही १३ हजार मिनी अंगणवाड्या आहेत त्या मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून मान्यता दिली. शिवाय १३ हजार अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता ही भरती जिल्ह्यात सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात साडेपाच हजार अंगणवाड्या आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांच्या एकूण ५ हजार ३७५ मंजूर पदांपैकी २३३ पदे रिक्त आहेत, तर ५ हजार ३७५ मदतनिसांच्या मंजूर पदांपैकी ४ हजार ६४८ पदे भरलेली व ७२७ पदे रिक्त आहेत. अंगणवाडी मदतनिसांची निवड गावातीलच महिलांमधून होणार आहे. किमान अर्हता १२ वी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. कागदपत्रांच्या आधारेच गुणांकन होते. यामध्ये मुलाखती होत नाहीत. कुणी ठरवले तरी वशिलेबाजी करता येत नाही.
अशी होणार निवड
       अंगणवाडी मदतनीस पदासाठी एकूण १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. यात बारावीत ८० टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर ६० गुणांकन होईल. याशिवाय उमेदवार पदवीधर, डी.एड., बी.एड., एमएस.सी आयटी धारक असेल तर अतिरिक्त गुण मिळतील. विधवा, अनाथ, तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव असल्यास अशा विविध बाबींचे गुणांकन करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी बारावी व बारावीनंतरची सर्व गुणपत्रके व्यवस्थित जोडावी तसेच अर्जाची पोहोच घ्यावी. निवड ही पारदर्शकपणे होणार असल्याने भरतीसाठी कुणाही अधिकारी, कर्मचाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही. अशी मागणी केल्यास तक्रार करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!