google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीमहाराष्ट्र

राज्यातून मार्चमध्ये 2200 मुली गायब!

रोज सरासरी 70 मुली बेपत्ता; तीन महिन्यात 5610 मुली बेपत्ता; रूपाली चाकणकरांची माहिती

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा 2 हजार 200 एवढा असून गेल्या तीन महिन्यात राज्यातून तब्बल 5 हजार 610 मुली गायब झाल्या आहेत. 
         राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातून मार्च महिन्यात 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचे सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज 70 मुली गायब झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींचे वय 18 ते 25 वयोगटातील आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील 5 हजार 610 तरुणी गायब झाल्या आहेत.

 

           मुली बेपत्ता होण्याची कारणे लग्न, नोकरी, प्रेमाचे आमिष अशी सांगितली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेमप्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

अहवाल सरकारला पाठवला- चाकणकर

मागच्या 16 महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनला मीसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? किंवा त्यांचं काम कसं चालतं, हे पाहणं गृह विभागाचं काम आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. गृहविभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी चाकणकर यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!