राज्यातून मार्चमध्ये 2200 मुली गायब!
रोज सरासरी 70 मुली बेपत्ता; तीन महिन्यात 5610 मुली बेपत्ता; रूपाली चाकणकरांची माहिती
मुली बेपत्ता होण्याची कारणे लग्न, नोकरी, प्रेमाचे आमिष अशी सांगितली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेमप्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
अहवाल सरकारला पाठवला- चाकणकर
मागच्या 16 महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनला मीसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? किंवा त्यांचं काम कसं चालतं, हे पाहणं गृह विभागाचं काम आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. गृहविभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी चाकणकर यांनी केली आहे.
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023