google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

जुन्या वादातून युवकावर तलवारीने हल्ला

नेवासा तालुक्यातील घटना

                                        स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : तालुक्यातील अमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडुरंग दत्तात्रय पवार (वय 24) रा. वाटापूर हे 18 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वाटापूर ते करजगाव रोडवर मोरे वस्ती अमळनेर येथून जनावरांची औषधे आणण्यासाठी जात असताना त्याठिकाणी एक विना नंबरची दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेले शरद निवृत्ती चोपडे, बंटी औटी (दोघे रा. वाटापूर), प्रकाश थोरात व एक अनोळखी (दोघे राहणार तमनर आखाडा ता. राहुरी) यांनी फिर्यादी यास धक्का देत खाली पाडत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली व सोबत आणलेल्या लोखंडी पाइप, तलवारीने फिर्यादी यास मारहाण करत जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.

                   आज 20 जुलै रोजी दाखल फिर्यादीवरुन गुन्हा र नं. 310/2024 बीएनएस 118 (1), 115(2), 352, 351 (2)(3), 324(4)(5), आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बी.एम.तागड हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!