
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगरः मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी (दि.12) अहमदनगर शहरात येत असल्याने या वेळी होणाऱ्या गर्दीचा विचार करून नगर शहर व उपनगरातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संयुक्तपणे परिपत्रक काढून सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना पाठवले आहे.
अहमदनगर शहरात सोमवारी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीचे आयोजन केलेले आहे. यानुसार अहमदनगर येथे जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्रित होणार आहे. सदर गर्दीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदनगर शहर व उपनगरातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार (दि. 12) रोजी स्थानिक सुट्टी देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.