ब्रेकिंग
घरकुलापासून कुणीही वंचित राहणार नाही!
पानेगांव ग्रामपंचायतीचे आवाहन; घरबसल्या ॲपद्वारे होईल नोंदणी; आवास योजना नोंदणीकरिता ३० एप्रिलपर्यंत मुदत

स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आवास प्लस सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या निर्देशानुसार गावपातळीवर सर्वेक्षणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे गावातील गरजू लाभार्थीं वंचित राहणार नसल्याचे पानेगांव लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले-आंबेकर यांनी सांगितले.
सर्वेक्षणासाठी अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी नोंदणीकृत सर्वेक्षक (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्यामार्फत, तसेच सेल्फ सर्वे म्हणजेच पात्र व्यक्ती घरबसल्या ॲपद्वारे स्वतः किंवा दुसऱ्याच्या मदतीने आवास प्लस या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सर्वेक्षण करू शकतात.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सर्वेक्षणासाठी घरातील सर्व सदस्यांची आधार कार्ड, कुटुंबप्रमुखाचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, जॉब कार्ड नंबर (नरेगा इत्यादी अंतर्गत) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर अॅपचा वापर करताना एका मोबाईलमधून फक्त एकाच कुटुंबाचा सर्वे करता येणार आहे. त्यामुळे अधिक माहिती भरताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
स्थानिक पातळीवर केले जाणार मार्गदर्शन
सर्वेक्षण करताना आवश्यक प्रक्रियेदरम्यान ग्रामस्थांसाठी स्थानिक पातळीवर सविस्तर मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा
मुदतीपूर्वी सहभागाचे ग्रामस्थांनी ही अत्यंत उपयुक्त अशी केंद्र शासनाची घरकुल योजना आपल्या गावात प्रभावीपणे राबवण्यासाठी या सर्वेक्षणात उत्स्फूर्तपणे सहभाग या योजनेअंतर्गत आपण पात्र ठरल्यानंतर पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे ही संधी कोणत्याही प्रकारे गमावू नये, असे आवाहन पानेगांव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच निकीता भोसले-आंबेकर यांनी केले आहे. अंतिम तारीखेच्या आत आपला सर्वे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन पानेगांव ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी केले आहे.
घरकुलाबाबत केंद्र शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून ग्रामपंचायत सदस्य वाड्यावस्त्यांवर जावून याबाबत माहिती देणार असून घरकुल योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही. – सौ दिपाली ज्ञानेश्वर जंगले, ग्रामपंचायत सदस्य, पानेगाव.