google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

नेवासा शहरात जनसंवाद यात्रा

यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद; शहर अध्यक्ष रंजनदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे आयोजन

                                 स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : शहर काँग्रेसचे अध्यक्ष रंजनदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली व सेवादलाचे रमेश जाधव, एस टी विभागाचे शाम मोरे तसेच महिला कॉंग्रेसच्या शोभा बोरगे व मिरा वडागळे यांच्या सहकार्यातून निघालेल्या पदयात्रेने, नेवासा शहरातील नागरीकांना नवी आशा दाखवली. 
          प्रदेश कॉंग्रेसच्या महासचिव उत्कर्षाताई रूपवते, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, आदीवासी सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जनसंवाद यात्रेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .
            उत्कर्षाताई रूपवते यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल  केला की 2014 पासून आपल्या देशात केंद्र सरकारची मनमानी हुकूमशाही चालू आहे. केंद्र सरकारने देशामध्ये शेतकऱ्याविरोधाचे काळे कायदे आणले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी गगनाला भिडली आहे. त्याबद्दल केंद्र सरकार एक शब्दही काढत नाही. त्यांचे काही कार्यकर्ते आपल्या महापुरुषांचा अपमान करतात. त्यांच्यावर अगदी नीच पातळीचे वक्तव्य करतात, त्यांना तिरंगा मान्य नाही असे म्हणतात आणि आपले सरकार त्यांना गुरुजी म्हणतं, आता या सरकारला धडा शिकवायची वेळ आली आहे तरच या देशात लोकशाही वाचेल.
          ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, देशात चाललेली सरकारची हुकूमशाही व जनतेची मुस्कटबाजी या विरोधात जनतेने निर्भय बनायला हवे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी येणाऱ्या काळात या मनुवृत्तीविरुद्ध आपण लढा देण्यास सज्ज व्हायला हवे. कार्लस साठे म्हणाले की  हे सरकार फक्त धन दांडग्यांचे सरकार आहे. यांना सामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही, या केंद्र सरकारने जो खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. तो फक्त त्यांच्या अदानी आणि अंबानी यांसारख्या मित्रांसाठी, त्यामुळे आता या सरकारला उलथून लावण्याची वेळ आली आहे. ज्ञानेश्वर भंगड म्हणाले की हा देश संविधानावर चालणारा देश आहे या देशात विविध धर्म आणि भाषेचे लोक राहतात. पण मोदी सरकार हे जाती धर्माबद्दल द्वेष पसरून देशात विषमतेचे बीज पेरत आहे. या देशांमध्ये समानतेची वागणूक देणारा आणि एकात्मता दर्शवणारा फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि तोच देशाला तारू शकतो.  
               शहराध्यक्ष रंजनदादा जाधव म्हणाले की, भाजप सरकारने देशामध्ये द्वेष, नफरत, तेढ, भेदभाव पसरवण्याचे काम केले आहे आणि याचसाठी प्रेमाचा एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश घेऊन ’नफरत छोडो भारत जोडो’ हा राहुल गांधींचा संदेश जनतेपर्यंत  पोहचवण्यासाठी ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. जनसंवाद यात्रेस प्रचंड यश मिळत आहे. सर्वसामान्यांचे, तरुणांचे, व्यावसायिकांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणे हे आमचे परम कर्तव्य आहे. रमेश जाधव यांनी उपस्थि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.
             या जनसंवाद यात्रेमध्ये तालुका काँग्रेसचे साहेबराव पवार, तालुका उपाध्यक्ष सतीश तऱ्हाळ, किरण साठे, शहर उपाध्यक्ष मुसा बागवान, संजय होडगर, गोरक्षनाथ काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन भवाळ, संजू भाऊ वाघमारे, रावसाहेब नवगिरे, शहर काँग्रेसचे राजू सरोदे, अनिल पवार, सोमनाथ बर्डे, बाळासाहेब जाधव, बाळू मोरे, अजय बर्डे, शिवनाथ जाधव, लहानु मोरे, दारकानाथ बर्डे, नवनाथ जाधव तसेच महिला काँग्रेसच्या सुशिलाबाई गायकवाड, माधूरी जाधव, अर्चना जाधव, चंद्रकला साळवे, शकूबाई शिरसाट, माया भालेराव, चंद्रकला माळी, अर्चना बर्डे, मीरा आहेर, वैशाली माळी, शीला पवार अर्चना मनुरे सहित शहर व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.
राष्ट्रीय एकात्मता, माणुसकीचे रक्षण ही आमची मूळ विचारधारा असून देश आणि संविधान वाचण्यासाठी अथक संघर्ष केला जाईल. ~शहर अध्यक्ष रंजनदादा जाधव
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!