google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ताब्रेकिंग

नगर जिल्ह्यातील काद्यांला रास्त भाव मिळणार

नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार; केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन; खा. लोखंडे यांची माहिती

                                        स्वराज न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर (शिर्डी) येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधितांना दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली.
         
                   खा. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. खा. लोखडे यांनी ना. गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या 24.03 रुपये  प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे 20.75 पैसे  प्रतिकिलो आहे. हे तीन रुपयांचे नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधितांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. 24.03 प्रति किलोप्रमाणे शासनाने कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली.  
                 
                अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करावी ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली.  
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!