google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

30 जूनपर्यंत ई-केवायसी करा

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; ई-पॉस मशिनद्‌वारे ई-केवायसी केली जाणार

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्तभाव दुकानातून 30 जुनपर्यंत ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचेमार्फत करण्यात येत आहे.
             सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण २९ लक्ष ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
            याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमुद योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे. जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशिनद्‌वारे ई-केवायसी केली जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!