google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दोन आंदोलकांची जलसमाधी?

नेवाश्यात धनगर आरक्षण चिघळले; दोघांनी नदीपात्रात उड्या घेतल्याची चर्चा

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाने नेवासा फाटा येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण केले जात आहे. मात्र राज्यव्यापी आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बुधवारी अ.नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर टायर पेटवून संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर शुक्रवारी जलसमाधी घेण्याचाही मनोदय व्यक्त केला होता.
       याबाबत अधिक माहिती अशी की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील 9 दिवसापासून नेवासा फाटा येथे सूरु असलेल्यां आंदोलनास धनगर समाजाचे आंदोलक उपोषणासाठी बसले होते. त्यामधील बाळासाहेब कोळसे रा. आडगाव ता. पाथर्डी व प्रल्हाद चोरमारे रा. छ. संभाजीनगर यांनी प्रातर्विधीला जावून येतो असे सांगुन उपोषण स्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला फोन केला की “आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार” असे सांगून फोन बंद केला. प्रशासनाकडून या दोन आंदोलकांची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरु झाली आहे.
गाडीत लिहून ठेवलेली चिठ्ठी
          गोदावरी पुलावर प्रल्हाद चोरमारे यांची कार एम एच 17 बी डब्ल्यू 7007 उभी असून कारच्या डॅश बोर्डवर चिठ्ठी लिहून ठेवली असून स्वतःचे मोबाईल सीटवर ठेवलेले आहेत. गाडी लॉक केलेली आढळून आली. कोळसे व चोरमारे यांचा पाण्यामध्ये शोध कार्यासाठी एडीआरएफची तुकडी बोलाविण्यात आली आहे. सदर घटनेमुळे नेवासा तालुक्यातील परिस्थिती संवेदनशील बनली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!