google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; असा पहा निकाल

                                    स्वराज न्यूज नेटवर्क

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोमवारी 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

             विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात येणार आहे.

         परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसंच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या लिंकवर निकाल पाहू शकणार आहात

1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com

कसा पहाल निकाल?

– सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
– क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

10 मे रोजी दहावीचा निकाल?

      दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळं साधारणपणे एसएससी बोर्डाचा निकाल हा पुढच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कधीही लागू शकतो. निकाल 15 मेच्या आतच लागणार, अशी माहिती एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

21 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत…

          यंदाच्या वर्षी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये तब्बल 8 लाख मुलं, 7 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. तर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान बारावीच्या विविध शाखेतील परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागेल त्यानंतर दहावीचे निकाल समोर येतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!