google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

सर्व जातींचा मोफत वधू-वर मेळावा

शिरूरमध्ये पहिल्यांदाच होणार आयोजन; गावागावांत मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर

                            स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आजकाल मुला-मुलींचे लग्न जमवण्यासाठी कोणालाही सध्या वेळ नाही. तसेच लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा प्रश्न गंभीर स्वरुपात वाढलेला आहे. या प्रश्नाकडे समाजाचेही दुर्लक्ष आहे. त्यासाठी जगदंब फाउंडेशन संचलित मराठी सोयरीक संस्थेने रविवार 11 डिसेंबर रोजी पहिल्यांदाच शिरूरमध्ये आयोजित केलेल्या सर्व जातींसाठी मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर येथील मूकबधिर विद्यालयाचे संस्थापक जयवंतराव सरोदे यांनी केले आहे.    
     
               येत्या रविवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता निसर्ग गार्डन, न्हावरा फाटा, शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी सर्व जातीमधील वधू-वरांसाठी राज्यस्तरीय भव्य मोफत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यापूर्वी शिरूरमध्ये कधीही असा वधू वर मेळावा झालेला नाही. त्यामुळे शिरूरसह आसपासच्या तालुक्यातील वधू-वर व पालकांना या मेळाव्याची उत्सुकता लागलेली आहे. 
             
              महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील सर्व क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी बघायला मिळतील. स्वतः वधू, वरांनी हजर राहणे गरजेचे आहे, अशी माहिती जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे, गणपतराव देठे, सुनील निचित, कालिदास भोगाडे, रावसाहेब दरेकर, राजू सातपुते, ज्ञानेश्वर पवार, आदिक वाबळे, लालासाहेब जाधव, चंद्रकांत आहेर, शिवाजी रोकडे, जयश्री कुटे यांनी केले आहे.
             
          या मेळाव्यात विधवा, विदुर, घटस्फोटीत स्थळे देखील बघायला मिळणार आहेत. त्यामुळे अशा इच्छुक वधू-वरांनी पुनर्विवाहासाठी जरूर यावे. मेळाव्यामध्ये समोरासमोर वधू-वरांना पाहता येते, चर्चा करता येते. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली जगदंब फाउंडेशन अंतर्गत मराठी सोयरीक ही शासन मान्य नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक शिक्षक, शेतकरी, महिला वर्ग, विविध शासकीय कर्मचारी, अधिकारी मोठ्या आवडीने लग्न जमवण्याचे कार्य करतात. या सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत 64 वधु वर मेळावे झाले आहेत. 2500 लग्न जमलेले आहेत. त्यापैकी 450 लग्न हे पुनर्विवाहाचे जमलेले आहेत. 
     
           विवाहयोग्य स्थळ भेटत नसल्यामुळे पालकांना वधू-वरांना प्रचंड समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे अशा मेळाव्याची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त वधू-वर पालकांनी मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी व भविष्यात कोणत्याही मेळाव्यासाठी 7447785910 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!