google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

श्रीक्षेत्र देवगड येथे पत्रकार दिन साजरा

नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन; समाज जागृतीसाठी पत्रकारांचे कार्य तारेवरच्या कसरतीसारखेच-गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज

                              स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येऊन पत्रकार दिन  साजरा केला. समाज जागृतीसाठी पत्रकारांचे कार्य हे तारेवरच्या  कसरतीसारखेच असून देशाचे वैभव वाढीसाठी व समाजात समरसता कशी निर्माण होईल यासाठी पत्रकारांनी काम करावे, सन्मान स्वीकारणाऱ्यांनी अपमान सहन करण्याची देखील तयार ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन  गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांनी यावेळी बोलतांना केले.
    
        श्रीक्षेत्र देवगड येथील यात्रा निवास सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या समवेत नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, मार्गदर्शक विनायकराव दरंदले, गुरुप्रसाद देशपांडे, सुखदेव फुलारी, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ कचरे, देवगडचे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे, हभप लक्ष्मीनारायण जोंधळे, देवगड भक्त मंडळाचे मराठवाडा विभाग प्रमुख बजरंग विधाते, मुरमे गावचे सरपंच अजय साबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
            
          यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्वलन करून पत्रकार दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. जेष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांनी पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा  परिचय करून दिला.
   
          यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक अडीचणींना सामोरे जावे लागते, सन्मानाबरोबर अवमानही सहन करावा लागतो, चांगले काय वाईट काय याचे मंथन करून ते समाजापुढे मांडत रहाणे हेच पत्रकारांचे काम आहे, पत्रकारांचा झालेला सन्मान त्यांचा नसून त्यांच्या गुणांचा सन्मान आहे, समाजात अनेक होणाऱ्या घडामोडी समाजाला कळाव्यात म्हणून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो ही वस्तुस्थिती देखील त्यांनी यावेळी बोलतांना विषद केली. सर्व जाती धर्माची देवस्थाने ही समाजाच्या सुखाकरीता आहेत. तिर्थक्षेत्रांच्या होणाऱ्या उन्नतीमुळे उद्योग व्यवसाय उभे राहतात. त्यामुळे परिसरातील लोकांना  रोजगार उपलब्ध होत असतो.  सर्व देवस्थानच्या उत्कर्षासाठी देखील पत्रकारांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
           
            यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते बन्सीभाऊ एडके (आदर्श वृत्तपत्र विक्रेता), उमाकांत भोगे (जीवन गौरव), अशोक डहाळे (आदर्श पत्रकारिता), सोपान भगत (इलेक्ट्रॉनिक मीडिया) पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रात करत असलेल्या प्रबोधन कार्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला. तर उपस्थित पत्रकार बांधवांना आ. शंकरराव गडाख यांच्या वतीने डायरी, लेखणी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. फिल गुड कंपनीचे प्रमुख डॉ. भारत करडक व सुनील मोरे यांच्या वतीने उपस्थित पत्रकारांना गुळ कँडी पुड्यांचे वाटप करण्यात आले.
         
          यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर जेष्ठ पत्रकार विनायकराव दरंदले यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचे आभार मानले. उपस्थित पत्रकारांना मिष्टान्न देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!