google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

माणसांच्या प्रेमाची वर्तुळे वाढणे गरजेचे : डॉ. ढगे

'ऋतुरंग' दिवाळी अंकाचे प्रकाशन

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : समाज बलवान आणि मानसिकदृष्ट्या निरोगी होण्यासाठी माणसांच्या प्रेमाची वर्तुळे वाढणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.
                 दिवाळी सणाच्या निमित्ताने ऋतुरंग अंकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. ढगे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज समाजामध्ये आपलं माणूस हा विषय निकडीची व प्रेमाची गरज झाली आहे. तो विषय धरून संदर्भीय लेख छापलेले आहेत. माणुसकी हाच हाच खरा मानवाचा धर्म व माणसाचे प्रेमाचे वर्तुळ वाढत राहिली पाहिजे. त्यामुळे समाज सुदृढ व मानसिक दृष्ट्या निरोगी होईल. आज समाजामध्ये मानसिक प्रदूषण वाढलेले आढळते. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात जात, धर्म, पंथ हे भेदभाव कमी करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाले. त्याला यशही मिळाले. तथापि आज प्राप्त स्थितीमध्ये हे भेदभाव उफाळून येत आहेत. प्रत्येक माणसाने आपल्यापेक्षा वेगळ्या जाती व धर्मामध्ये मित्रत्वाची वर्तुळे तयार करून त्याचा व्यास वाढवावा हा या अंकाचा आत्मा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी कुलगुरू व कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले. 
          जेष्ठ साहित्यिक मा. खा. यशवंतराव गडाख व आ. शंकरराव गडाख यांच्या परिवारांच्या मुळा सहकारी साखर वतीने कारखान्याचे कृषी विभागाचे अधिकारी सकाहारी कोरडे यांनी सदरचा अंक डॉ ढगे यांना सस्नेह भेट दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी वाचन केल्यानंतर अभिप्राय व्यक्त केला आहे. समाजामध्ये वाचन संस्कृती जोपासली पाहिजे ती वाढीस लागली पाहिजे. यासाठी नेवासा तालुक्यात फिरते मोफत वाचनालय सुरू केले असल्याबद्दल डॉक्टर ढगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!