आरोग्य व शिक्षण
प्राईड अँकेडमीने दर्जेदार शिक्षण द्यावे, आम्ही मदतीसाठी तत्पर
युवा नेते उदयन गडाख; इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेजचा शुभारंभ

स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव येथे प्राईड अँकेडमी व उमेद फाऊंडेशन संयुक्त इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख हे आपल्या भाषणात बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे आ. लहू कानडे होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भागवतपठन करून करण्यात आली.
आपल्या भाषणात गडाख यांनी सांगितले की, पुढची दुरदृष्टी ठेवून जेष्ठ नेते साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख पाटील यांनी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात शिक्षणाबरोबरच कारखानदारी पाया भक्कम केला. आ. शंकरराव गडाख पाटील हे गडाख साहेबांचा मागदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत आहे. विविध विकास कामे मार्गी लागत आहे. मुळाथडी परीसर हा बागायती जरी असला तरी येथे शिक्षणाचा सुविधा उपलब्ध नाही. दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोनई, राहुरी, नगर, श्रीरामपूर, नेवासे येथे विद्यार्थींना जावे लागते. हिच सुविधा प्राईड अँकेडमीने क्वालिटी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे. आम्हीही मदतीसाठी तत्पर आहोत. त्याच बरोबर येथील दहा ते बारा गांव वंदनाताई तुमच्याबरोबर राहतील असा विश्वास गडाख यांनी व्यक्त केला.
आ. लहूजी कानडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून ग्रामीण भागात प्राईड अँकेडमीने गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घ्यावे भविष्यात नव नवीन उपक्रम राबवून नावलौकीक निश्चितच वाढणार असल्याचे सांगितले.
प्राईड अँकेडमीच्या अध्यक्ष वंदना मुरकुटे यांनी सांगितले की, भेर्डापूर येथे जंजिरे पाटील यांचा कांदा चाळीच्या शेडमध्ये दहा वर्षांपूर्वी सुरु केलेली संस्था आज शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार शिक्षण, डिजिटल सुविधामुळे विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आला. आज वांगी येथे ७५० विद्यार्थी इंग्लिश स्कूल तसेच ज्युनिअर कॉलेज शिक्षण घेत असून मुळाथडी परीसरात प्राईड अँकेडमी नक्कीच थोरा मोठ्यांचा आशिर्वादाने भरारी घेईल असा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला.
सचिन गुजर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, ज्या पद्धतीने मंदिर तसेच धार्मिक कामात तनमनधनाने योगदान दिले जाते. त्याच पद्धतीने आपण शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष देवून मंदिराच्या रुपाने शाळा शैक्षणिक धोरण गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, अरुण नाईक, अशोकराव भोसले, विराज भोसले, भरत साळुंखे, राजेंद्र कोकणे, शांताराम तुवर, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, मुळाचे संचालक संजय जंगले, रंगनाथ जंगले, दत्तात्रय घोलप, भगिरथ जाधव, कुशाराम जाधव, विजय जाधव, सतिश फुलसौंदर, संजय कंक, विलास धामणे, जालिंदर जंंगले, अप्पासाहेब जाधव, यमाजी जाधव, काकासाहेब जाधव, काशिनाथ आयनर, तुषार विटनोर, कोंडाजी विटनोर, अण्णासाहेब बिडे, संजय पवार, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, अविनाश जाधव, सुहास टेमक, सुर्यकांत टेमक, रमेश जंगले, कैलास जाधव, रमेश गुडधे, अप्पासाहेब काळे, शरद कोलते, डाॅ गुडधे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेद फाऊंडेशन अध्यक्ष बी वाय वाघ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दादासाहेब जाधव यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.