google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सरकार वाचले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय; 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

                                  स्वराज न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या 11 महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

            महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचे प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्यापीठाकडे देण्यात आले आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

           उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे पुढील अडचणीत वाढ झाली. ते सरकार पुन्हा स्थापन होऊ शकत नाही, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. याशिवाय तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या भूमिकेविषयीही ताशेरे ओढले आहेत.

           गेल्या 11 महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन केले. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने विविध मुद्यांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना शिंदे गटाला धक्का दिला आहे. मात्र अंतिम निकालामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. 

  • कोर्टाने नोंदवलेली महत्त्वाची निरीक्षणे
  1.  कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा. रेबिया प्रकरण 7 बेंचकडे
  2. राज्यपाल भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे, बहुमत चाचणी अयोग्य होती
  3. ठाकरेंनी राजीनामा देणं चूक होत, राजीनामा दिला नसता परिस्थिती जैसे थे करता आली असती
  4. सरकारमधील स्पीकरने अविश्वास प्रस्तावाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यपालांना अधिकाराचा वापर करणे न्याय्य ठरते. कलम 174 मंत्रि परिषदेच्या मदतीशिवाय आणि सल्ल्याशिवाय या प्रकरणात राज्यपालांची भूमिका घेणे उचित नाही असे याचिकेत नमूद केले आहे.
  5. राज्यपालांनी ठरावाच्या मुद्यावर आणि विलीगीकरणाच्या नोटीसच्या आधारे केलेल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही
  6. राज्यपालांकडे असे कोणतेही वस्तुनिष्ठ परिस्थिती नव्हती ज्या आधारे ठराव करणार्‍या सरकारच्या विश्वासावर शंका घेऊ शकता.
  7. शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
  8. गट नेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा
  9. बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही
  10. राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!