google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगराजकिय

प्रशासनाकडून टपाली मतदारांची आकडेवारी जाहीर नाही

मतदान होऊन उलटले दोन दिवस; लोकांची उत्सुकता शिगेला; नेवाशात सर्वात जास्त मतदान

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्वात जास्त मतदान करण्याचा विक्रम नेवासा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी प्रस्थापित केला आहे. जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या नेवासा तालुक्यात शांततेत आणि विक्रमी मतदान झाले. मतदानाची सहा वाजताची वेळ संपल्यानंतरही सर्वच मतदान केंद्रावर मतदान चालू होते. मतदान संपेपर्यंत 89.84 टक्के मतदान झाले होते. परंतु यामध्ये किती लोकांनी टपाली मतदान केले याची आकडेवारी प्रशासन टपाली मतदान होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही देऊ शकलेले नाही. टपाली मतदान करण्याचा शेवटचा दिवस 19 नोव्हेंबर हा होता. नेवासा तालुक्यात एकूण मतदान किती झाले याची नेवासकरांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.
           नेवासा तालुक्यातील २७६ मतदान केंद्रावर उत्साहात मतदान पार पडले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के, अकरा वाजता २२ टक्के, एक वाजता ३९ टक्के, तीन वाजता ५५ टक्के तर पाच वाजता मतदानाने ७० टक्क्यांची सरासरी ओलांडली होती. तर मतदान संपेपर्यंत 80 टक्के लोकांनी मतदान केले होते.
           नेवासा विधानसभा क्षेत्रात 2 लाख 83 हजार 111 मतदाता आहेत. यामध्ये 1,45,927 पुरुष मतदाता, 1,37,180 स्त्री मतदाता, 4 तृतीय पंथीय मतदाता आहेत. यापैकी मतदान संपेपर्यंत एक लाख 18 हजार 578 पुरुषांनी तर एक लाख 7 हजार 450 महिलांनी व एका तृतीयपंथीय मतदाराने असे दोन लाख 26 हजार 29 लोकांनी मतदान केले होते. ते एकूण ७९.८४ टक्के मतदान झाले आहे.
        निवडणूक कामात व्यस्त असलेले कर्मचारी हे टपाली मतदान करत असतात. दि. 19 नोव्हेंबरपर्यंत या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे परंतु अद्याप किती लोकांनी टपाली मतदान केले याची आकडेवारी प्रशासन मतदानाला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही देऊ शकलेले नाही.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!