क्रिडा व मनोरंजन
होमगार्डला वैभव प्राप्त करून देऊ
माणिकराव भडांगे यांचे प्रतिपादन; शनिशिंगणापूर येथे होमगार्ड मेळावा संपन्न
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महाराष्ट्र राज्यात 46 हजार होमगार्ड जवान कार्यरत असून त्यातील अनेक होमगार्ड विविध कारणांनी कमी केले होते. त्यांना आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. होमगार्ड जवानांना 50 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा सुरू केला असून पुढील काळात 365 दिवस बंदोबस्त मिळण्याकामी आमचा शासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते माणिकराव भडांगे यांनी केले.
शनिशिंगणापूर येथे मंदिर परिसरामध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या होमगार्ड मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्याबरोबर मुंबईचे माजी समादेशक अधिकारी दीपक कांबळे हे देखील उपस्थित होते. कांबळे यांनी हे होमगार्डच्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्हाच नव्हे तर मुंबई, औरंगाबाद, चाळीसगाव जिल्ह्यातील पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होमगार्ड जवानांनी बंदोबस्त काळात येत असलेल्या अडचणी यावेळी मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत नेवासा समादेशक अधिकारी बाळासाहेब देवखिळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोला येथील समादेशक अधिकारी पुष्पा नाईकवाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिभा श्रीखंडे यांनी केले.
यावेळी सुनिता भोसले, सुनिता थोरात, भारती करोड़ी, रजनी मोरे, नागेश पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र आवारी, पलटन नायक दिलीप गायकवाड, अशोक टेमकर, राजेंद्र बोरुडे, अल्ताफ शेख, उमेश इंगळे, गफ्फार शेख, बाबासाहेब घोडेकर, शंकर जायगुडे, विठ्ठल जाधव, रुक्मिणी सरोदे, सरिता आगळे, सुनंदा कवडे, गणेश लोहकरे, आरिफ इनामदार, दादा कसबे आदी होमगार्ड जवान उपस्थित होते.