google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

पहिल्या टप्प्यात ४ लाख शेतकऱ्यांना १२९ कोटींचे वाटप; नेवाशातील ५२ लाख ४५६ शेतकऱ्यांना १९ कोटी १ लाख ६९ हजार मिळणार

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नुकताच करण्यात आला. जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांचे अनुदान जमा करण्यात आले.
         कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार राज्यातील खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९६ लाख ७८७ इतकी आहे. 
            राज्य सरकारच्यावती निकषानुसार पात्र असणाऱ्या नगर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. उर्वरित शिल्लक शेतकऱ्याच्या खात्यावरही मदत लवकरच वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. ऐन नवरात्रोत्सवात शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय मदत देवी पावली आल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
        जिल्ह्यात कापूस पिकासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ७४ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी ७५ लाख ५६ हजार, तर  सोयाबीन पिकासाठी २ लाख ३८ हजार २१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७४ कोटी ६७ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सण – उत्सवाच्या काळात शासनाकडून मदत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
          अहमदनगर तालुक्यातील २१ हजार ५६४ शेतकऱ्यांना ७ कोटी ९ लाख १३ हजार,  पारनेर २८ हजार ३० शेतकऱ्यांना ७ कोटी ३२ लाख २२ हजार, पाथर्डी ४० हजार ९२८ शेतकऱ्यांना ११ कोटी ५ लाख ३१ हजार, कर्जत ९ हजार १३८ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ७२ हजार, जामखेड २५ हजार ३६९ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख ९६ हजार, श्रीगोंदा १९ हजार ४२९ शेतकऱ्यांना ५ कोटी ९२ लाख ७५ हजार, श्रीरामपूर २२ हजार ६६५ शेतकऱ्यांना ८ कोटी ५३ लाख ९५ हजार, राहुरी ३३ हजार १ शेतकऱ्यांना १० कोटी ७५ लाख ४६ हजार, नेवासा ५२ लाख ४५६ शेतकऱ्यांना १९ कोटी १ लाख ६९ हजार, शेवगाव ३७ हजार ६ शेतकऱ्यांना १२ कोटी ३४ लाख ३५ हजार, संगमनेर ३६ हजार ७८१ शेतकऱ्यांना १० कोटी ३६ लाख ३६ हजार, कोपरगाव २२ हजार ८६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ३८ लाख १७ हजार, अकोले २२ हजार ८६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ३८ लाख १७ हजार आणि राहाता तालुक्यातील २९ हजार ९६९ शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचे मिळून १० कोटी २१ लाख ८१ हजार अनुदान वितरित करण्यात आले आहे.
 जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत. केवायसी पूर्ण करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरदेखील अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!