google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवासा फाटा येथे मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन

भारतीय संविधान विजयाच्या घोषणा; संविधान संघर्ष समितीचे मोरे यांचे संबोधन

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा तालुक्यातील सर्व समाजातील संविधानाला मानणारे चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहुन सामुदायिकपणे मनुस्मृतीचा निषेध करत भारतीय संविधानाचा विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
          या वेळी संविधान संघर्ष समितीचे संयोजक गणपतराव मोरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना संबोधित करताना सागितले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराष्ट्र राज्याची त्यावेळची राजधानी रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या कार्यकर्त्यां समवेत महाराजांचा जय जयकार करत मनुस्मृतिचे दहन करत भारतातील जनतेला जाहिर केले कि आजपासुन हा मनुचा असमानतेचा काळा क़ायदा आपण जाळुन टाकत आहोत आणि सर्वांसाठी समानतेचा भारतीय संविधानाचा कायदा सर्वांसाठी खुला करत असल्याचे मोरे यांनी उपस्थितांना सागण्याचा प्रयत्न केला.
              मुकिंदपुरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी सांगितले की आजचा दिवस हा स्त्री मुक्तीचा दिवस आहे कारण मनुच्या कायद्याने स्त्रियांना वाईट वागणुक दिली जात होती. सती जाण्यासारखा प्रकार होत होता. तो भारतीय संविधानाने बंद केला आणि स्त्रियांना सन्मान देण्यास सुरुवात करण्यात आली म्हणूनच स्त्रिया सन्मानाने जीवन जगत आहेत.
          या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते जगधने गुरुजी, गणपतराव मोरे, पोलीस पाटील आदेश साठे,  संजय वाघमारे, अंजुम पटेल, राम मगरे, कृष्णा कर्डिले, गणेश झगरे, सोनु लकारे, योगेश गायकवाड, सोहेल पठाण इ मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!